नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपचे खासदार संजय सिंह यांनी गेल्या महिन्यात एक भाकीत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना TV वर येऊन रडतील असे म्हटले होते. यावरून सिंह यांनी केलेले भाकीत खरा ठरल्याचा दावा केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांशी सवांद साधला. करोनामुळे मरण पावलेल्यांबद्दल बोलताना मोदींचा कंठ दाटून आल्याचे दिसले. यावरून समाज माध्यमावर याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
जो 17 अप्रैल को बोला था
21 मई को सच हो गया।
देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये
ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे। pic.twitter.com/lDvQQmvlmw— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 21, 2021
पंतप्रधान मोदी डॉक्टरांशी सवांद साधते वेळी वाराणसी परिस्थितीबद्दल बोलत होते. यावेळी कोरोना मुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे. कोरोना मुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींना रडू आलं. यावरूनच आप’चे खा. संजय सिंह म्हणाले की, जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवीय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको आहेत. ज्यांनी स्वत: निवडणुकीवेळी प्रचारसभा घेऊन कोरोना चा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत, असा घणाघात संजय सिंह यांनी ट्विटद्वारे केलं आहे.
आम आदमी पार्टीचे संजय सिंह हे राज्यसभेचे खासदार आहेत. १७ एप्रिल रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी एक भाकीत केले होते की, अजून थोडा दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान) तुमच्यासमोर येतील. ते केवळ त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते TV वर रडतील. तसेच देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले याबाबत बातम्या चालवतील. यावरून आप’ने एक पत्रक काढून त्यामध्ये म्हटले की, १७ एप्रिलला संजय सिंह यांनी केलेले विधान हे खरे ठरले आहे. त्यांनी व्यक्त केलेले भाकीत २१ मे रोजी खरं ठरलं आहे. असे त्या पत्रात नमूद केले आहे.