तामिळनाडू : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभेसाठी राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढण्याची तयारी दाखवल्यांनतर .काँग्रेसचे खासदार व नेते शशी थरूर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे नरेंद्र मोदींनीही केरळ किंवा तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवायला हवी होती, असे एका मुलाखतीत म्हटले आहे.
राहुल यांच्या उमेदवारीने दक्षिणेकडील राज्यात बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच राजकीय वर्तुळात यावर्षी वायनाडच का ? अशी जोरदार चर्चाही सुरु आहे .आगामी पंतप्रधान दक्षिणेतील राज्यातून निवडून गेल्याचे समाधान मिळण्याची त्यांना आशा आहे. मोदी व भाजपवर टीका करताना थरूर यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाने नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावरून फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानाकडून अशा प्रकारचे प्रयत्न होतात ही निराशाजनक बाब आहे.मोदी हे भाजपातील तोडफोडीच्या राजकारणाचे शिल्पकार आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत हे तत्व सोडून ते वागत आहेत.
काँग्रेसला हिंदू बहुल मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची भीती वाटते अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथील सभेत केली होती. राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा आहे.याच संघराज्यवादाने १९४७ पासून देश एकसंध ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेतील केरळ किंवा तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवायला हवी होती, असे थरूर यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारच्या काळात दक्षिणेकडील राज्यांशी केंद्राचे संबंध बिघडले आहेत. दक्षिणेतील आर्थिक स्थिरता सरकारने धोक्यात आणली आहे त्याचबरोबर आगामी काळात या राज्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत साशंकता निर्माण केली, असा आरोप शशी थरूर यांनी केला आहे.