नवी दिल्ली : वृत्त संस्था – Modi Government | देशात रेल्वे प्रवास सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी सरकारने बुधवारी टीसीएएस सारख्या स्वदेशी सुरक्षा प्रणालीला मंजूरी दिली. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेला 4जी बँड म्हणजे 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 5 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमसुद्धा मंजूर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय रेल्वेला 700 मेगाहर्र्ट्ज फ्रीक्वेन्सी बँडमध्ये 5 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम वाटपाला मंजूरी दिली. या स्पेक्ट्रममुळे रेल्वेला स्टेशन परिसर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये सार्वजनिक बचाव आणि सुरक्षा सेवा चांगल्या करण्यास मदत होईल.
Important decisions taken by Modi govt to further enhance the safety and security of train operations in India.
• Indigenously developed ‘Train Collision Avoidance System’.
• Allotment of 5 MHz spectrum in 700 MHz frequency band for public safety.https://t.co/XIaeEeCBTk
— Amit Shah (@AmitShah) June 9, 2021
25,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक
या स्पेक्ट्रमसोबत भारतीय रेल्वे आपल्या रेल्वेमार्गावर एलटीई (लाँग टर्म इव्हॉल्यूशन) आधारित मोबाइल ट्रेन रेडियो कम्युनिकेशन प्रदान करेल. यामुळे लोको पायलट (ट्रेन ड्रायव्हर) आणि ट्रेन गार्डमध्ये चांगला संवाद स्थापन होऊ शकतो. सोबतच स्टेशन, ट्रेन आणि कंट्रोल रूममध्ये सुद्धा कम्युनिकेशन चांगले होईल. यामुळे रेल्वेमार्गाच्या सुरक्षेत वाढ होईल. हा प्रोजेक्ट पुढील 5 वर्षात पूर्ण केला जाणार आहे, ज्यावर 25,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज आहे.
स्वदेशी तंत्रज्ञान रोखणार ट्रेनची धडक
याशिवाय भारतीय रेल्वेने स्वदेशी प्रकारे विकसित ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टम (टीसीएएस) ला सुद्धा मंजूरी दिली आहे. ही एक ऑटोमॅटिक ट्रेन सुरक्षा प्रणाली आहे जी रेल्वेगाड्यांची धडक टाळण्यास मदत करेल. यामुळे रेल्वे दुर्घटना कमी होतील आणि प्रवाशांची सुरक्षा चांगली होईल.
अमित शाह यांचे ट्विट
सरकारच्या या महत्वाच्या निर्णयाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, देशात ट्रेनच्या वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी मोदी सरकाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
कृपया हे देखील वाचा:
एकाच दिवशी ओपन होत आहेत तीन IPO, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या पूर्ण डिटेल्स
राज्यातील पोलीस पाटलांसाठी दिलासादायक बातमी ! मानधनात होणार वाढ; मंत्रिमंडळ उपसमितीस प्रस्ताव सादर
‘नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही’ – शरद पवार