नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांना लाभदायक असलेली देशातील सर्वात मोठी योजना म्हणजे मुख्यामंत्री कृषी आशीर्वाद योजना. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १३ लाख ६० हजार ३८० शेतकर्यांनी लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांना डीबीटीमार्फत ४४२ कोटी रुपयांची रक्कम पाठविली गेली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १५ लाख शेतकर्यांना पैसे दिले जाणार होते. या योजनेअंतर्गत चार किंवा सहा हजार रुपयांऐवजी संपूर्ण २५ हजार रुपये शेतीसाठी वर्षाकाठी मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसेही यात जोडले गेले तर ते ३१ हजार रुपये एवढे मिळणार आहेत. ज्याच्याकडे फक्त एक एकर जमीन आहे त्याला ११ हजार रुपये मिळणार आहे.
दरम्यान ही योजना १० ऑगस्टपासून झारखंड राज्यात सुरू झाली. जाणून घेऊया या योजनेसंदर्भात :
१) मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजनेंतर्गत वर्षाकाठी ५ ते २५ हजार रुपये वेतन दिले जाईल. पीएम-किसान फंड मदतीने हि राक्कम ११ ते ३१ हजार असेल.
२) जास्तीत जास्त पाच एकरांसाठी एक एकर ५००० रुपये दराने २५ हजार रुपये दिले जात आहेत.
३) पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेमध्ये यापूर्वी ६ हजार रुपये रक्कम मिळत होती.
कोण घेऊ शकतं लाभ :
– योजना फक्त झारखंडमधील मूळ रहिवासी, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे.
– ज्यांनी इतर राज्यांतून येऊन इथे जमीन खरेदी केली त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
– कृषी विभाग किंवा कलेक्ट्रेडकडून फॉर्म घेऊन तुम्हाला त्यामध्ये शेताविषयक कागदपत्रे जोडावी लागतील.
– त्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती हे शेताचा मालक आहे, हे सांगणे महत्वाचे आहे.
– बँक खाते क्रमांक, रेशन कार्ड आणि किसान कार्ड अनिवार्य आहे.
– जर बँक खाते आधारशी जोडले गेले नाही तर शेतकऱ्यांना होणारा लाभ नाकारला जाईल.
कृषी विभागानुसार मुख्यमंत्री कृषी आशीर्वाद योजनेतून सुमारे ३५ लाख शेतकर्यांना ३ हजार कोटींची मदत मिळणार आहे. राज्य सरकारचे प्रयत्न आहे की शेतकर्यांना खत, बियाणे आणि कीटकनाशके इत्यादींसाठी कोणत्याही सावकार व बँकेकडून कर्ज घ्यावे लागणार नाही. गेल्या पाच वर्षात कृषी विकास दरात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.२०१४ मध्ये ते -४.५ टक्के होते, जे २०१९ मध्ये वाढून १४.५ टक्के झाले आहे.