लखनौ वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असून शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. त्याआधीच, निकालाची जोरदार चर्चा सुरु असून राजकीय नेत्यांनी त्यांच्या परीने अंदाज लावायला सुरवात केली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असा दावा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.
पुढील पंतप्रधान अनुसूचित जातीतील असेल, मायावतींचं काम बोलतं आणि गरज पडल्यास मी त्यांना समर्थन देईन. मायावती या पंतप्रधान पदासाठीच्या प्रबळ दावेदार आहेत. असं राजभर यांनी म्हटलं आहे. मी भाजपा युती तसेच काँग्रेस महागडी या दोन्हीही सोबत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
ओम प्रकाश राजभर म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला. लोकसभा निवडणुकीत ११९ खासदार अनुसूचित जातीतील असतील. त्यामुळे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असा दावा राजभर यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमध्ये ओमप्रकाश राजभर कॅबिनेट मंत्री आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून राजभर यांनी भाजपच्या विरोधातील उमेदवारांना समर्थन दिले आहे.