मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे तर २३ मे रोजी लोकसभेच्या महासंग्रामाचा निकाल हाती येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखीच होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवस टिकेल, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच धमाका उडवून दिला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू असून, त्यास २१ मे रोजी मूर्त रूप येईल, असेही पवार यांनी सांगितले. भाजपा नेते म्हणतात कि, आह्मी ३०० च्या वर जागा जिंकू यावर बोलताना पवार म्हणाले, भाजपविरोधात मोठा जनक्षोभ आहे. तरीही भाजप नेते लोकसभेच्या ३०० जागा येतील, असे सांगत आहेत. आठ महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही राज्ये हातातून गेली, यातून ट्रेंड काय आहे, ते कळते. असे असताना हे ३००-५०० जागा येतील असे सांगतात, याला अर्थ नसल्याचेही ते म्हणाले.
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे तर २३ मे रोजी लोकसभेच्या महासंग्रामाचा निकाल हाती येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तरी त्यांच्या सरकारची अवस्था १९९६च्या वाजपेयी सरकारसारखीच होईल. हे सरकार अवघं १३ किंवा १५ दिवस टिकेल, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच धमाका उडवून दिला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू असून, त्यास २१ मे रोजी मूर्त रूप येईल, असेही पवार यांनी सांगितले. भाजपा नेते म्हणतात कि, आह्मी ३०० च्या वर जागा जिंकू यावर बोलताना पवार म्हणाले, भाजपविरोधात मोठा जनक्षोभ आहे. तरीही भाजप नेते लोकसभेच्या ३०० जागा येतील, असे सांगत आहेत. आठ महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही राज्ये हातातून गेली, यातून ट्रेंड काय आहे, ते कळते. असे असताना हे ३००-५०० जागा येतील असे सांगतात, याला अर्थ नसल्याचेही ते म्हणाले.