मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या लसीकरण (Vaccination) पुरवठ्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे, तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून (Central Government) महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची (Vaccination Centers) केंद्र बंद करावी लागत आहेत, असं मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ‘लसीचा दुसरा डोस घेणार्या नागरिकांची संख्या वीस लाख असून पहिला डोस घेणार्या लोकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोसची लस मिळेल पण पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे (Vaccination Centers) बंद पडत असल्याची माहिती नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी दिली आहे.
पुढे नवाब मलिक म्हणाले की, ‘खासगी रुग्णालयात (Private hospital) लसीचा साठा आहे. तो
संपत नाही. खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला त्या लसीची मुदत संपेल ही भीती वाटते आहे म्हणून
त्यांनी तो साठा सरकारला तात्काळ द्यावा जेणेकरून निर्माण झालेली लसटंचाई कमी होईल. असं ते
म्हणाले. तर, जेव्हा त्यांना आवश्यक आहे त्यावेळी टप्प्याटप्याने ती लस परत करण्यात येईल, असा
निर्णय मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत देखील झाल्याचे मलिक यांनी म्हटले. तसेच,
महाराष्ट्रात निर्माण झालेली लसटंचाई लक्षात घेता केंद्राने तात्काळ लसीचा पुरवठा करावा अशी
मागणी देखील मलिक (Minister Nawab Malik) यांनी केंद्र सरकारकडे (Central Government) केली असल्याचे सांगितले.
Web Title : minister nawab malik covid 19 vaccination centers have be closed due non supply vaccines state center allegation nawab
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MHT-CET 2021 | एमएचटी CET परीक्षेची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु – मंत्री उदय सामंत
Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु होणार नाहीत