लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानवरील हल्ल्यासाठी राफेल विमान उपयुक्त ठरले असते. असे मत खुद्द मोदींनी अलिकडेच एका जाहींर सभेत व्यक्त केले होते. त्यावर मायावती यांनी पंतप्रधान मोदींला सवाल करत गेल्या ५ वर्षांच्या राजवटीत भारतीय हवाईदलात एकही राफेल विमान का येऊ शकले नाही. असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.
देशाची सुरक्षा यंत्रणा हाताळण्यात मोदी सरकार निष्फळ पाहाले आहे. असा सवालही त्यांनी मोदींना ट्विटरवरून विचारला आहे. जैश-ए – महंमदच्या पाकिस्तानातील अड्ड्यावर कारवाईसाठी राफेल विमान उपयोगी पडले असते. असे मत खुद्द मोदींनी अलिकडेच एका जाहींर सभेत व्यक्त केले होते. त्यावरून मायावती यांनी त्यांच्यावर हा निशाणा साधला आहे.
भारताच्या हवाईदलाने पाकिस्तानातील जैश-ए – महंमदच्या अड्ड्यावर हल्ल्यासाठी मिराज २००० विमानांचा वापर केला होता. भारताने युपीए सरकाच्या काळातील १२६ विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. पण तो करार मोडून फ्रांसशी २६ राफेल विमान खरेदीचा नवीन करार मोदी सरकारने केला आहे. त्यानुसार येत्या सप्टेंबर महिन्यात देशात पहिले राफेल विमान दाखल होणार आहे