नवी दिल्ली बहुजननामा ऑनलाईन – उत्तर प्रदेश सरकार आपले अपयश लपविण्यासाठी सोनभद्र येथे कलम १४४ लावून तेथे कोणालाही जाऊ देत नाही. असं ट्विट बसपा प्रमुख मायावती यांनी केलं आहे.
मायावती म्हणाल्या की, युपी सरकार जिवित आणि मालमत्तेचे रक्षण व जनतेच्या हित जपण्यात अयशस्वी झाले आहे. त्यामुळे हे अपयश लपविण्यासाठी कलम १४४ चा आधार घेत आहे. तरी योग्य वेळी तेथे जाऊन पिडीतांना शक्य ती मदत करण्याचे निर्देश बसपाच्या विधानमंडल दलाला देण्यात आले आहेत. या हिंसाचाराचे मुख्य कारण सरकारचा हलगर्जीपणा आहे.
त्यासोबतच आणखी एका ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, युपी मध्ये आदिवासी समाजवर अन्याय व त्यांचे शोषण तसेच जमीनीवर अधिकार आणि त्यानंतर आता हिंसाचार याप्रकरणात भाजप सरकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अयशस्वी झाले आहे. केवळ उत्तर प्रदेश नाही तर देशातील जनताही यामुळे चिंतीत आहे. बसपाचे सरकार असताना आम्ही एसटीच्या हिताचा विचार केला होता.
सोनभद्र येथे गेलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनाही सरकारने कलम १४४ लावल्याचे कारण सांगत तेथे जाण्यास मज्जाव केला होता. त्य़ानंतर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चांगलाच वाद पेटला होता.