नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून नवी दिल्ली येथे सुरु झालेल्या १७व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत नवनिर्वाचित सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. मोदींनी शपथ घेताना ‘मोदी…मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणाही झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसकडे इशारा करत राहुल गांधी कुठे आहेत ? असा प्रश्न विचारला.
१७ व्या लोकसभा अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, ५ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. १९ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील.
मोदी यांनी बोलताना सांगितले कि, जनतेने विरोधी पक्षांना कोणताही कौल दिलेला असो. मात्र, विरोधकांची भावना आणि त्यांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मौल्यवान आहे. सभागृहात खासदार म्हणून बसल्यावर विरोधी पक्षापेक्षा निष्पक्षतेची भावना गरजेची आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी विभागणी करण्यापेक्षा निस्पृह भावनेने जनकल्याणाला प्राधान्य द्यावे. जेणेकरून येत्या पाच वर्षांमध्ये आपण संसदेची प्रतिष्ठा वाढवू, असे मोदींनी सांगितले.
Prime Minister Narendra Modi arrives at the Parliament for 17th Lok Sabha, says, "Every word of the Opposition is important." pic.twitter.com/TxTVzQkOF2
— ANI (@ANI) June 17, 2019