नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणीत NDA ला घवघवीत यश मिळाले या मिळालेल्या मताधिक्क्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप करत या विरोधात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर ‘EVM हटावो, देश बचावो’ पुकारले आहे.
त्या अंतर्गत नांदेड शहराच्या वतीने वंचित बहुजन आघाडी सह रिपब्लिकन सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ह्या घंटानाद मध्ये सहभागी होते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. भोकर मध्ये सुद्धा सुभाष तेले, दत्ताजी डोंगरे, भीमराव दुधारे, सुनील कांबळे, राजेश चन्द्रे यांच्या नेतृत्वाखाली भोकर शहरात तहसील कार्यालय समोर शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन घंटानाद आंदोलन करून EVM विरोधी घोषणा बाजी केली. देशभरात ‘EVM विरोधात संशयाचे वातावरण आहे.
यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रातल्या सर्व ४८ मतदारसंघात झालेले एकूण मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील ४८ मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे “घंटानाद आंदोलन” करण्यात आले. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्त्यांसह महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “ईव्हीएम हटाव देश बचाओ” घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ह्या एकदिवसीय घंटानाद मध्ये शेकडो evm विरोधी लोकांनी सहभाग नोंदवला आहे.