मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जेष्ठ मराठी अभिनेते गिरीश साळवी यांचे वरळी इथल्या राहत्या घरी निधन झाले. ते दिर्घ काळ आजारी होते. अभिनेते राजेश देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.
बुद्धिबळ आणि झब्बू, चौर्याहत्तर पावसाळ्यांचा जमाखर्च, तुमचं आमचं सेम असतं, अनेक प्रायोगिक नाटकात त्यांनी काम केले होते. गिरीश साळवी हे एक उत्कृष्ट नट आणि दिग्दर्शक होते. त्यांची गाजलेली नाटके आजही लोकांच्या मनात आहेत. वरळी इथल्या सुरप्रवाह संस्थेत़र्फे राज्यनाट्य व कामगार नाटक स्पर्धेत ही नाटके खूप गाजवली होती. पहिला राजा, समाधी, बाप हा बापच असतो, व आविष्कार संस्थेकडुन गाजलेली नाटक- जाता नाही जात, बुद्धीबळ आणि झब्बू, इंदू काळे व सरला भोळे, चौर्याहत्तर पावसाळ्याचा जमाखर्च तसेच अनेक मराठी मालिकांमध्ये गिरीश साळवी यांनी काम केले.