औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – भाजपा सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी जमलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांसह समन्वयकांनी सरकारने दिलेले मराठा आरक्षण हे फसवे आहे. न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी. समाजासाठी आत्मबलिदान दिलेल्या कै. काकासाहेब शिंदे वगळता इतर कोणालाही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यांना ती मदत तत्काळ देण्यात यावी. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. याशिवाय भाजप सरकारविरुद्ध यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..