अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – बदलत्या परिस्थितीत मराठा समाजाने ही मुला-मुलींसाठी स्थळे पाहण्यामध्ये श्रम, वेळ आणि पैशांची बचत करुन मराठा सोयरीक ग्रुपच्या वधूवर मेळाव्यात सामील होवून विवाह ठरवावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे केंद्रिय सदस्य चंद्रकांत नवले यांनी केले. मराठा सोयरीक ग्रुपच्यावतीने विवाहेच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांचा ३२ वा मेळावा नुकताच आयोजित केला होता. यावेळी ग्रुपचे संचालक अशोकराव कुटे, विजय उगले, मंजाबापू गुंजाळ, संचालक जयकिसन वाघ, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा जयश्री कुटे, वृषालीताई कडलग, डॉ.दिपाली पानसरे, उपनगराध्यक्ष विवेक कासार, संगमनेर दूध संघाचे संचालक विलासराव कवडे, गणेशराव कवडे, आण्णासाहेब राहणे, सुनील नवले, डॉ. दिलीप सोनवणे, संजय आम्बरे, दिलीपराव शेणकर, सोमनाथ नवले, काशिनाथ डोंगरे, पत्रकार संजय नवले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुंजाळ म्हणाले की, मराठा समाजातील मुलीच्या पालकांनी मुलाकडून अपेक्षा कमी ठेवल्या तर योग्य वयात मुले व मुलींचे लग्न होतील. विशेष करून शेतकरी मुलांचा विचार करावा. फक्त मुलगा निर्व्यसनी व कमावता असायला हवा. कासार व कवडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याचे कौतुक केले व दिवसेंदिवस शेतकरी मुलांच्या लग्नाविषयी चिंता व्यक्त केली. कुटे यांनी प्रास्ताविक करताना मुलींनी शेतकरी नवरा स्वीकारावा असे आवाहन केले. ३५१ वधू-वराची नावनोंदणी या मेळाव्यात झाली. त्यात ५ लग्न जमण्याच्या मार्गावर आहेत. मेळाव्याचे सूत्रसंचालन नंदकुमार रहाणे यांनी केले. उपस्थित मुलींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. भागवत घुले, संजय आम्बरे, शंकर सातपुते, बाळासाहेब वाकचौरे, लक्ष्मण मडके, अंजली पठारे, दिनकर घुले, मधूशेठ गाडे, वसंतराव गुंजाळ, चासकर सर, विभागीय कृषी अधिकारी मुसमाडे आदि मान्यवर उपस्थित होते.