कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि बंगाली अभिनेते तापस पाल यांच्या निधनाला केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. केंद्राच्या अन्वेषण विभागाने पाल यांच्यावर दबाव टाकल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तर टीएमसीच्या प्रमुखाने तापस पाल यांचा मृत्यू केंद्र सरकारच्या ‘सूडाच्या राजकारणा’मुळे झाला आहे, असे म्हटले.
तापस पाल हे ६३ वर्षाचे असता त्यांचे मंगळवारी मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना कार्डियाक अरेस्ट आला होता. पाल हे टीएमसीचे माजी खासदार होते. ते ‘रोज वेल चिटफंड घोटाळ्या’त आरोपी होते. त्यांना एक वर्ष तुरुंगवात राहावे लागले होते.
बुधवारी ममता यांनी पाल यांना श्रद्धांजली देताना सरकारवर आरोप लावले आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचा आणखी एक नेता सुलतान अहमद यांचाही मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असल्याचे ममता यांनी म्हटले. सुलतान अहमद २०१७ मध्ये नरदा टॅप्स घोटाळा प्रकरणात आरोपी म्हणून सांगितल्यावर तेही तणावात आले होते. ममता यांनी रवींद्र सदनात पत्रकारांसह बोलताना म्हणाल्या की, ‘तापस पालवर केंद्रीय एजन्सीचा खूप दबाव होता आणि ते केंद्राच्या सूड राजकारणाचे शिकार बनले आहेत.’ पाल यांचा मृतदेह रवींद्र सदनात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठेवला आहे.