मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Unlock । कोरोनाच्या (Corona virus) वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने (State Government) राज्यात कडक निर्बंध (Restrictions) लागू केले होते. मात्र, काही प्रमाणात रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने काही प्रमाणात वेळेनुसार निर्बंध शिथिल केलेत. तर काही जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक असल्याने निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, आता राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून आता राज्यात टप्याटप्याने निर्बंध शिथिल केलं जाणार असल्याचं म्हंटल आहे. तर काही दिवसापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Health Minister Rajesh Tope) यासंदर्भात बोलून दाखवलं होतं. की, त्यामुळे मंत्रिमंडळात राज्यातील निर्बंध शिथील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरंतर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) देखील राज्यातील निर्बंधाला विरोध आहे.
राज्यात येत्या आठवड्यापासून टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. असे समजते. निर्बंध कशा पद्धतीने शिथिल करण्यात यावेत, याचा एक सविस्तर अहवालच्या माध्यमातून टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) पाठवला आहे. या अहवालानुसार सखोल चर्चा होऊन राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. निर्बंध शिथिल करण्यासाठी ‘ओपनिंग अप’ (Opening up) हा मंत्र अमलात आणला जाणार आहे. तसेच, पहिल्या टप्प्यामध्ये हॉटेल (Hotel), रेस्टॉरंट (Restaurant) आणि दुकानांची वेळ वाढवली जाणार असल्याचं समजते. यावरून यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या (Corona virus) दुसऱ्या जातीनं तोंड वर काढलं होतं. डेल्टा प्लस (Delta Plus) या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटपासून सावधान होत निर्बंध कठोर करण्यात आले होते. एक ते दोन आठवड्यातील राज्यातील परिस्थिती पाहाता कोरोना रुग्णांच्या संख्या आणि मृताची संख्या कमी होताना दिसत आहे. म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय देखील होण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान, सध्या राज्यात काही जिल्ह्यात आस्थापना सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच सुरु आहे. तर शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच काही जिल्ह्यात परिस्थिती चिंताजनक असल्याने तूर्त तेथे परवानगी दिली नाही. यामुळे तेथील व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (State Government) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
web title: Maharashtra Unlock | Will restrictions in Maharashtra be relaxed?
Post Office च्या ‘या’ बँकेत असेल खाते तर 1 ऑगस्टपासून होत आहे मोठा बदल, खर्च करावे लागतील जास्त पैसे