मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारच्या वतीने दुष्काळग्रस्त लोकांना कर्जमाफी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले होते. परंतु दोन वर्षांपूर्वी कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र मिळूनही कर्ज माफ न झाल्याने दाद मागणाऱ्या वाशिम येथील अशोक मनवर या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही घटना विधान परिषदेत उपस्थित केल्यावर चांगलाच गदारोळ झाला.
याप्रकरणी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या शेतकऱ्याची तातडीने सुटका करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश यांनी दिले.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता कर्जमाफीची प्रमाणपत्रे देण्यात आली , शेतकऱ्यांनी सरकारकडून बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याच्या तक्रारी केल्या आहे, असे सांगून मुंडे यांनी मनवरची कागदपत्रे सभागृहात दाखविली. हा शेतकरी आपल्याला भेटून गेल्यानंतर त्याला मरीनलाइन्स पोलिसांनी अटक केली. अन्याय झाल्याने दाद मागणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्नही मुंडे यांनी सभागृहात विचारला.
लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे
लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे