बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे असं उदय सामंत हे गेल्या 10 दिवसांपासून क्वारंटाईन आहेत. सामंत यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी आपली प्रकृती चांगली असल्याचं सांगत संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढील आठवड्यातच जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
उदय सामंत आपल्या ट्विटमध्ये लिहितात की, “गेले 10 दिवस स्वत: विलगीकरणात आहे. मी स्वत: कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मी गेल्या 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यानं संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रूजू होणार.”
गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2020
आतापर्यंत 15 मंत्री, डझनभर सनदी अधिकाऱ्यांना कोरोना
राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना झाला होता. जवळपास महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. आता पुन्हा एकदा ते सक्रिय झाले आहेत. गेल्या काही दिवसात ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अप्पर मुख्य सचिव दर्जाच्या काही अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ठाकरे सरकारमधील 43 पैकी 15 मत्री तसेच डझनभर अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत.