मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप सरकारला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाजपसोबत जाण्याची बाजू प्रथमच समोर आली आहे. उद्या सत्ता स्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायलय सकाळी आपला अंतिम निर्णय देणार आहेत. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील सत्ता संघर्षाचे नाट्य इतक्याच संपणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या पत्रात काय म्हटलं होतं, याचा उलगडा आज, सोमवारी सुप्रीम कोर्टात झाला.
आज कोर्टात अजित पवारांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचा खुलासा झाला. यामध्ये ‘राज्यात राष्ट्रपती राजवट नको, म्हणून मी सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत, असं अजित पवार यांनी पत्रात म्हटल्याचं सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणला वेगळीच कलाटणी मिळाली.
अजित पवार यांनी राज्यपालांना दिलेले पत्र २२ तारखेचे आहे. हे पत्र महाधिवक्ता तुषार मेहता यांनी कोर्टात वाचून दाखविले. कोर्टात झालेल्या सुनावणीत अजित पवार यांचे पत्र एक महत्वाचा युक्तीवाद ठरला. विरोधकांनी दावा केला होता की, राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने शपथविधी घेतली. यावर उत्तर देताना मेहता म्हणाले की, ‘अजित पवारांनी दिलेल्या पत्राच्या आधारे राज्यपालांनी शपथविधी घेतल्याचा दावा मेहता यांनी केला आहे.’ फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा पाठिंबा आहे. एक पवार आमच्या सोबत आहे तर दुसरे विरोधात. पवारांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणेघेणे नाही असे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले.
Visit : bahujannama.com