मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात अवघ्या ८० तासांपूर्वी स्थापन झालेले फडणवीस सरकारने अखेर मैदान सोडले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासातच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी काही आमदारांच्या साहाय्याने भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. अजित पवारांचं या भूमिकेवर नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांबरोबरच पवार कुटुंबाला अजित पवारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना यश आले आणि अजित पवार यांनी आपल्या पदाच राजीनामा दिल्यामुळं भाजपा सरकार अल्पमतात गेलं.
यामुळे शरद पवारांची यशस्वी खेळी केली असल्याचं बोलले जात आहे. तसेच ज्या अजित पवारांच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केलं. ज्यांच्यावर सिंचनाचे अनेक आरोप लावले गेले होते. त्यामुळे भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि, सकाळी अजित पवारांनी माझी भेट घेतली. त्यात त्यांनी आमच्यासोबत येण्यास अडचण आहे असं सांगत राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही. आम्ही कोणाचेही आमदार फोडणार नाही, घोडेबाजार करणं आम्हाला जमत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत, भाजपा विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करेल. जनतेचा आवाज बनवून न्याय देण्याचा. तसेच २ चाक असलेले सरकार वेगाने धावतं. मात्र तीन चाक असलेले सरकार धावेल पण रिक्षाप्रमाणे तीन चाकं वेगळी झाली तर सरकार कसं धावणार ? आम्ही ५ वर्ष प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम केलं. त्यासाठीच लोकांनी आम्हाला जनादेश दिला. जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आम्ही केलं. काही गोष्टी कमी झाल्या, चुकल्या असतील पण आमचं उद्दीष्ट जनतेसाठी काम करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com