बहुजननामा ऑनलाईन टीम – राज्यात मुख्यमंत्रिपदाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे शिवसेनाने भाजपापासून फारकत घेत थेट कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. राज्याच सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे या तीन बेठकांमध्ये बैठकांचे सत्र सुरु झाले. यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी सकाळी अचानक अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला ३० नोहेंबरपर्यंतची मुदत दिली. येत्या काळात राज्यात अतिशय वेगळ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
राज्यात नेमकं काय होऊ शकतं, जाणून घ्या
१) अजित पवारांचे बंड यशस्वी होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. कारण दोन तृतयांश आमदार अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता झाली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेले १३ पैकी १२ आमदार परतले आहे.
२) वर्षभराच्या कालावधीत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना राजकीय बळ देण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. अजित पवारांना राज्यसभेवर घेतले जाऊ शकते. हे दोन नेते भाजपाच्या गळाला लागल्यास मराठा व ओबीसींमध्ये भाजपाचा शिरकाव होईल. राष्ट्रवादीची राजकीय स्पेस कॉंग्रेसकडे जाऊ न देण्याची खटपट भाजपा करेल.
३) पुन्हा राष्ट्रपती राजवट आणि ती वर्षभर चालेल. यानंतर निवडणूक होईल.
४) अजित पवार यांचे बंड यशस्वी झाले तरी संख्या पुरेशी होण्यासाठी आणखी तडजोड लागणार.
५) फडणवीस हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याप्रमाणे राजीनामा देतील. मात्र राजीनामा देताना विधानसभा बरखास्तीची शिफारस करतील किंवा फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल अशी शिफारस राष्ट्रपतींकडे करतील.
६) अजित पवार व धनंजय मुंडे एकतर सत्तेत किंवा सत्तेबाहेर राहून भाजपाबरोबर राहिले तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात भाजपाला ताकद मिळेल. आज याच भागात भाजप कमजोर आहे. इतरत्र भाजपाची कामगिरी चांगली झाली आहे.
७) महाराष्ट्रात विरोधकांचे सरकार आल्यास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ताकद मिळेल. असे झाल्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांसाठी ती मोठी नामुष्की असेल. त्यामुळे असे होऊ यासाठी दोन्ही नेते संपूर्ण ताकद पणाला लावतील.
८) शरद पवार मवाळ होणार नसतील तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणूक हाच पर्याय भाजपासमोर आहे.
Visit : bahujannama.com