मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – इतक्या दिवसांच्या सत्ता संघर्षणानंतर राज्यात अखेर महाविकसआघाडीचे सरकर स्थापन झाले असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार सरदार तारासिंग यांनी आज सकाळी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचे तारासिंग यांनी सांगितले. तसेच महाविकासआघाडीचे सरकार ५ वर्षे चालेल असा विश्वास तारासिंग व्यक्त केला. दरम्यान सरदार तारासिंग यांचा मुलगा पीएनबी बँक घोटाळ्यात आरोपी आहे.
दरम्यान, तारासिंग हे मुलुंड मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाने तारासिंग यांना तिकीट नाकारलं . परंतु सत्ता गेल्याने भाजपाच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचीही माहिती आहे. आमदारांच्या शपथविधीवेळी भाजपाचे एकनाथ खडसे यांनी ही थेट फडणवीसांविरोधात वक्तव्य करुन खंत व्यक्त केली होती. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटं कापल्यानं भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे यांनी म्हणाले होते. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर २५ जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली.
तसेच अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या बैलगाडीभर पुराव्यासंबंधी खडसेंना विचारले असता खडसे म्हणाले, बैलगाडीभर आम्ही जे काही पुरावे गोळा केले, ते आम्ही केव्हाच रद्दीमध्ये विकले आहेत. त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता. खडसेंच्या या प्रतिक्रियेनंतर एकच गोंधळ उडाला आहे.
Visit : bahujannama.com