बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडीच्या विरोधात वेगवेगळ्या टिका करण्यात सुरुवात केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांच्या ‘देवेंद्र फडणवीसांना अहम् नडला’ या विधानावर टिका करुन म्हंटले आहे की, ”वस्तूस्थिती ही आहे की, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवून पवारांनी त्यांना कॉंग्रेससोबत जोडले आणि तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले आणि महायुतीला मिळालेल्या जनदेशाचा अपमान केला. ”
अतुल भातखळकर म्हणाले की, जनतेने 105 जागा मिळवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नाकारले. म्हणजे 50-55 जागा मिळवणाऱ्या तुमच्या पक्षाला लाथाडले असे म्हणावे लागले, असा टोला देखील त्यांनी शरद पवारांना लगावला. त्याचबरोबर मेट्रोच्या जनोपयोगी प्रकल्प बंद करुन मत्सलयाचा घाट घालणे म्हणजे तिघाडी सरकारची निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी आहे. वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे बंद करा अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा समाचार घेतला.
देवेंद्र फडणवीसांना अहम् नडला असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष @PawarSpeaks यांनी व्यक्त केलंय.वस्तूस्थिती ही की शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून पवारांनी त्यांना काॅंग्रेससोबत जोडले.तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले आणि महायुतीला मिळालेल्या जनादेशाचा अपमानकेला.@Dev_Fadnavis
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 3, 2019
राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील प्रकल्पांकडे मोर्चा वळवला आहे. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पुनर्विचार केला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मेट्रोसारखे जनोपयोगी प्रकल्प बंद करून मत्सालयाचा घाट घालणे म्हणजे तिघाडी सरकारची निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी आहे. वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे बंद करा. @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 3, 2019
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘मी पुन्हा येईल’ असे सगळे म्हणत असतात त्यात वेगळे काहीच नाही मात्र, हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. निवडणुकीच्या काळातील त्यांच्या भाषणांमध्ये मी पणाचा दर्प होता. त्यांना त्याची किंमत मोजावी लागली, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर त्या पाठिंब्याचा उपयोग आपल्या संघटन वाढीसाठी करून घ्यावा. मात्र त्यात मी पणाचा दर्प असू नये. त्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर टीका केली.
Visit : bahujannama.com