जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – अवघ्या १० दिवसांवर विधानसभेची निवडणूक आली असता, विविध पक्ष जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी आश्वासनांवर आश्वासने, घोषणाबाजी देत आहेत. त्यात भाजप- शिवसेना यांची युती असूनही दोन्ही पक्ष एकमेकांवर प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करत असत असतात. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे, त्यांच्या याच आश्वासनावर गिरीश महाजन यांनी चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. ‘कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जाणार आहे, ‘ असा टोला महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
जळगावात पत्रकारांशी संवाद साधताना महाजन यांनी अनेक मुद्यांवरील प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही चिमटा काढत सुनावले कि , इतके वर्षे सत्ता गाजवली, तरी इतके वर्षे जनतेच्या मनात काय आहे हे तुम्हाला ओळखता आले नाही, आम्हाला ते ओळखत आले म्हणून किती जागा येतील, हे आम्ही सांगू शकतो. असे सांगत महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या घोषणाबाजीवर देखील आपले मत मांडले आहे. उद्धव यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेण्यात येतील असे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करणार असल्याचं आश्वासन देत आहेत. एवढेच नाही ते दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ते १० रुपयांत जेवणाची थाळी आणि १ रुपयांत आरोग्य तपासणी अशी आश्वासनही देत आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या काही गोष्टी भाजपाला खटकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अक्कलकोट येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी भाजपाला बहुमत द्या , तर शिवसेनेचे संजय राऊत यांनी शिवसेनेला १०० च्या पार गेली पाहिजे, अशी घोषणा बाजी केली पाहिजे, त्यामुळे जरी या दोन्ही पक्षांत निवडणुकीसाठी युती असली तरी प्रचार मात्र आपापल्या पक्षाचा करताना दिसत आहेत.
Visit : bahujannama.com