औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभेवरून केंद्रित मंत्री रावसाहेब दानवे कात्रीत सापडले आहेत. सत्तार यांची सभा सिल्लोडमध्ये घेतली तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल आणि नाही घेतली तर त्यांचा त्रास भोकरदनमध्ये सहन करावं लागेल, त्यामुळे पक्षधर्म पाळायचा, कार्यकर्त्यांचं ऐकायचं कि मुलाच्या राजकीय वाटचालीत मदत करायची अश्या राजकीय पेचात सध्या दानवे अडकले आहेत.
महायुतीचे सिल्लोड मतदार संघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांची प्रचार सभा घेणे, हे पक्षकार्य म्ह्णून महत्वाचे आहे. परंतु त्यांची सभा घेण्याबाबत भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शविला जात आहे. आणि दुसरीकडे जर सभा घेतली नाही तर त्याचे परिणाम भोकरमध्ये दिसून येतील असा इशारा सत्तार यांनी दानवेंना दिला आहे, त्यामुळे रावसाहेब दानवे पेचात पडले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपात सिल्लोड मतदार संघ हा शिवसेनेला देण्यात आला असून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे भाजपच्या नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली. त्यामुळे भाजपचे प्रभाकर पालोदकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे धड सिल्लोडमध्ये सभा घेता येईना, ना ही भोकरदन मध्ये राजकीय गणित जुळत आहे, त्यामुळे दानवे वैतागले आहे.
Visit : bahujannama.com