मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकतीच केंद्रिय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील निवडणूकांची घोषणा केली. राज्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावनिक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे,’ असे पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘राज्यातील जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केले, देशाचा संरक्षण मंत्री केले, १० वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरुन दिले आहे. आता मला आणखी काही नको.’ असे म्हटले आहे.
देशासमोर आज मोठे प्रश्न आहेत. शेतकरी, तरूण, कामगार अडचणीत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते काही करायला तयार नाहीत. pic.twitter.com/4RP79uUoJX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणूकांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात आजपासून आचारसंहिताही लागू झाली आहे. राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीत २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यात ८.९४ कोटी मतदार असून १.८ लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया २ नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. निवडणूकीचा अर्ज भरण्याची तारीख २७ सप्टेंबर आणि शेवटची तारीख ४ ऑक्टोबरपर्यंत असेल.
तर ३ ऑक्टोबरला अर्ज छाननी होईल आणि ७ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.त्यानंतर २१ ऑक्टोबरला मतदान होईल. या निवडणूकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी होईल. २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकांमध्ये भाजपला १२२, शिवसेनेला ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ४१ जागा तर इतर पक्षांना २० जागा मिळाल्या होत्या.
- त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी आहे ‘हा’ खास उपाय, होतील ‘अमेझिंग’ फायदे
- आपल्या मुलांना द्या रोज एक अंडे, होतील ‘हे’ ९ मोठे आरोग्यदायी फायदे
- रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी
- महिन्यात परत मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या कारणे
- ‘हे’ घरगुती उपाय आठवड्यातून २-३ वेळा करा, दूर होईल ‘नाभी इन्फेक्शन’
- पपईच्या रसाने होतात ‘हे’ खास ७ फायदे, रस घेण्यापूर्वी करा ‘हे’ एक काम
- आयुर्वेदानुसार पाणी किती आणि कधी प्यावे ? यामुळे कोणकोणते होतात लाभ