नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. तर काही ठिकाणी समर्थनासाठी भाजपा कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये सीएएच्या समर्थनासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. प्रशासन आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न करत होते आणि रस्त्याच्या मधोमध आंदोलन करणार्या लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात होतो.
#WATCH Madhya Pradesh: A protestor pulls hair of Rajgarh Deputy Collector Priya Verma, after she hits BJP workers and drags them. The clash broke out during a demonstration in support of #CAA. pic.twitter.com/7ckpZaFBkJ
— ANI (@ANI) January 19, 2020
या वेळी उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी एका आंदोलनकर्त्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्व आंदोलनकर्त्यांनी प्रिया वर्मा यांच्या भोवती जमत त्यांचे केस ओढले. या घटनेवर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, आजचा दिवस लोकशाहीतील सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. आज राजगडमध्ये उपजिल्हाधिकार्यांनी ज्यापद्धतीने समर्थन करणार्या आंदोलनकर्त्यांना लाथाडले, ओढले आणि थप्पड मारल्या, त्यांचा अवमान केला ते शब्दात सांगता येणार नाही. त्यांना आंदोलनकर्त्यांना मारणाचा आदेश मिळाला होता का ?
देशभरात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे की, ते या कायद्याचा विरोधा आहेत. या कायद्या विरोधात मुख्यमंत्री कमलनाथ आणि सरकारचे सर्व मंत्री व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदयात्राही काढली होती. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावर अधिकृत प्रतिक्रिया आली होती. यात त्यांनी म्हटले होते की, हे बील संसदेत आणण्यापूर्वी केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते. त्यांचे म्हणणे होते की, एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर केंद्र सरकारच्या हट्टामुळे परिस्थिती आवाक्याबाहेर चालली आहे. आणि यासाठी या कायद्याबाबत काँग्रेसची जी भूमिका आहे ती मध्यप्रदेश सरकारची भूमिका असेल.
Visit : bahujannama.com