नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून येत्या १२ आणि १९ मे शेवटचे दोन टप्पे शिल्लक आहेत या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप टोकाचे वाढताना दिसत आहेत .’ काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करा’ असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी केले आहे. ते इंदोर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार पंकज संघवी यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
देशासाठी त्याग करणाऱ्या मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी आपल्याला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली.
Punjab Minister and Congress leader Navjot Singh Sidhu in Indore: Congress is the party that gave freedom to the country, it is the party of Maulana Azad & Mahatma Gandhi, unhone 'goron' se aazadi di thi aur tum Indore walo ab 'kale angrezo' se iss desh ko nijaat dilayoge. (10.5) pic.twitter.com/wjsmmfxZxC
— ANI (@ANI) May 11, 2019
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला चौकीदार म्हणतात. मात्र, चौकीदार गरिबांचे दार सोडून अंबानींच्या दारासमोर उभा राहतो. काँग्रेसने आतापर्यंत देशाला ५ गांधी दिले. भाजपने मात्र, नीरव मोदी, ललित मोदी आणि तिसरा नरेंद्र मोदी असे पळणारे लोक दिले असल्याचे सिद्धू म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात इंदोर मध्ये (१९ मे ) रोजी मतदान होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना २०१४ मध्ये भाजपने उमेदवारी दिली होती. त्या आजपर्यंत आठ वेळा खासदार राहिल्या आहेत मात्र, यावेळी त्यांच्या जागी शंकर लालवाणी यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे.