नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभेत काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला, तर नीती आयोग बरखास्त करण्यात येईल, असे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी नियोजनआयोग बरखास्त करून नीती आयोग स्थापन केला पण आजपर्यंत नीती आयोगाने मोदी सरकारचे मार्केटिंग आणि आकड्यांमध्ये फेरफार करण्याशिवाय काहीही काम केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी ट्विटमध्ये , नीती आयोगावर टीका करत काँग्रेस पक्ष सत्तेत पुन्हा आल्यावर नीती आयोगाच्या जागी अत्यंत छोटा नियोजन आयोग आणणार आहे. या आयोगाचे सदस्य देशाचे मोठे अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते लोक असतील. या आयोगात १०० पेक्षाही कमी लोकांचा भरणा असेल. न्याय योजनेच्या घोषणेनंतर नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी या योजनेविरोधात मत प्रदर्शित केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर अशा प्रकारची कोणती योजना लागू करण्यात आली, तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत वाईट परिणाम होईल. राजीव कुमार यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.
@RahulGandhi
13h13 hours ago
More
If voted to power, we will scrap the NITI Aayog. It has served no purpose other than making marketing presentations for the PM & fudging data.
We will replace it with a lean Planning Commission whose members will be renowned economists & experts with less than 100 staff.