मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जे विद्यार्थी पोलीस आणि सैन्य भरतीची तयार करत आहेत त्यांच्यासाठी आता सशस्त्र सीमा दलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. सशस्त्र सीमा दलाकडून हवालदार पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामुळं आता भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इथं नोकरी मिळवण्यासाठी चांगला पर्याय आहे. राज्य सरकारनं राज्यात डिसंबरपर्यंत तब्बल 12 हजार जागांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता उमेदवारांची तयारी सुरू आहे.
लवकरच राज्यात पोलीस भरती होणार आहे. सशस्त्र सीमा दलानं 1522 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यांचं वय 18 ते 27 दरम्यान आहे अशा पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ज्यांची निवड होईल त्यांचा केंद्र सरकारच्या गृह खात्या अंतर्गत असलेल्या सरकारी नोकरी समावेश होईल. या उमेदवारांना 21700 ते 69100 रुपये प्रतिमहिना वेतन मिळणार आहे.
ज्यांची निवड होईल त्यांना नोकरीसाठी देशात कुठेही पाठवलं जाईल. दलाकडून निघालेल्या 1522 जागांमध्ये आर्थिक मागास व मागास प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी असणार आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निवृत्त सैन्य दलातील वारसांना व महिलांना मोफत अर्ज करता येणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी 10 सप्टेंबरपर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करणं बंधनकारक आहे.