नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआय) लाभार्थ्यांच्या विविध तक्रारींवर लक्ष वेधण्यासाठी त्यांचे मंत्रालय लवकरच ‘संतुष्ट’ मोबाइल अॅप सुरू करणार असल्याचे कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले. कामगार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, मंत्री यांनी राज्य विमा महामंडळ (ESIC) येथे आयोजित समारंभात ईएसआयसी लाभार्थ्यांसाठी काढण्यात येणाऱ्या ‘संतुष्ट’ मोबाइल अॅप बद्दल माहिती दिली.
यावेळी कामगार मंत्र्यांनी २४ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत ईएसआयसीच्या विशेष सेवा पंधरवड्याला सुरुवात केली. या पंधरवड्यात दररोज आरोग्य तपासणी शिबिरे, विमाधारकाची प्रलंबित बिले निकाली काढणे, तक्रारींचे निराकरण व मृत्यू / अपंगत्व असल्यास रोख लाभासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. यावेळी मंत्र्यांनी नवी दिल्लीतील बसदारपूर येथील ईएसआयसी हॉस्पिटलचे नाव बदलून साहिबसिंग वर्मा ईएसआयसी हॉस्पिटल असे ठेवले.याशिवाय ईएसआयसी आयुष हॉस्पिटल (ESIC AYUSH Hospital) नरेलाचे नावही पद्म विभूषण बृहस्पती देव त्रिगुणा हॉस्पिटल असे करण्यात आले.
‘पेंशन कम्युटेशन’ सुविधा
कामगार पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन फंडमधून आंशिक पैसे काढण्याची सुविधा (कम्युटेशन) पुनर्संचयित करण्यासाठी कामगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. या निर्णयाचा 6.3 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. पेन्शन कम्युटेशन अंतर्गत भागधारकांना पेन्शन फंडामधून आगाऊ पैसे काढले जातात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 15 वर्षांच्या कमी दराने पेन्शनची रक्कम घेतली जाते.
25 सप्टेंबर 2008 रोजी किंवा त्यापूर्वी पेन्शन फंडामधून आंशिक पैसे काढणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनाचे पुनर्संचयित करण्याच्या ईपीएफओच्या निर्णयाला श्रम मंत्रालयाने 20 फेब्रुवारी 2008 रोजी अधिसूचित केले.पेंशन कम्युटेशन अंतर्गत, पुढील 15 वर्षांसाठी पेन्शनमध्ये एक तृतीयांश घट केली जाते आणि कमी केलेली रक्कम एक वेळ दिली जाते. या योजनेत १५ वर्षानंतर निवृत्तीवेतनधारकास संपूर्ण रक्कम घेण्याचा हक्क असतो.