कोल्हापूर बहुजननामा ऑनलाईन- राज्य शासनाने सवलतीच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करून सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषिपंपाची अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी, तसेच , यासह अन्य मागण्यांसाठी शेतकर्यांनी महावितरण कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. मोर्च्यादरम्यान अधिकारी वेळेत न आल्याने पोलिसांचे कडे तोडून कार्यालयात घुसण्याचा संतप्त आंदोलकांनी प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले.
दरम्यान, यापूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची महिनाभरात अंमलबजावणी न केल्यास दि.९ ऑगस्ट रोजी महामार्ग रोको करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. वेळप्रसंगी मंत्रालयाला घेराव घालण्याचा निर्धार शेतकर्यांना करावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.
वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात तसेच कृषी पंपाचे वीज कनेक्शन त्वरित मिळावे, वाढीव वीज बिले कमी करावीत, कृषी पंपांना दिवसा किमान बारा तास वीज पुरवठा करावा, यंत्रमागधारकांना वीजदरात सवलत मिळावी, राज्यातील ४१ लाख शेती पंपधारक ग्राहकांची वीज बिले तपासून दुरुस्त व अचूक करण्यात यावीत, वीज बिले दुरुस्त केल्यानंतर त्याआधारे कृषी संजीवन योजना राबवावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन तसेच सर्वपक्षीयांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चाची सुरुवात दसरा चौकातून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाली. ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर मेळाव्यात रूपांतर करण्यात आले. या ठिकाणी अनेक नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. मोर्च्याच्याव वेळी घोषणा बाजीही करण्यात आली ‘दाबाय लागतोय खटका, महावितरणला द्यावा लागतो झटका’, अशा घोषणा देत मोर्चा नेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार : राजू शेट्टी
राजू शेट्टी म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी महामार्ग रोखला होता. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली हेाती. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण लेखी आश्वासन देत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यातील एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोल्हापुरात येतील, तेव्हा आम्ही त्यांना जाब विचारू.
काय आहेत मागण्या ?
शेतीपंपांना वीज कनेक्शन मिळालीच पाहिजेत’
शेतकर्यांची फसवणूक करणार्या सरकारचा धिक्कार असो’
‘खोटी वीज बिले रद्द करा’
खोटे बोलणार्यांना शासन झालेच पाहिजे’