धुळे : बहुजननामा ऑनलाइन – चंद्रपूरमधील खंबाडा चेकपोस्टवर कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांची काही गोस्तकरांनी निघृर्णपणे
हत्या केली व त्यांच्या अंगावर वाहन घालून अपघात दाखविण्याचा प्रकार केला. तरी या घटनेतील आरोपींनी फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २० रोजी पोलिस कर्मचारी प्रकाश मेश्राम हे खंबाडा चेकपोस्ट येथे पहाटेच्यावेळी नाकाबंदीवर कर्तव्य बजावत होते. यावेळी काही गोस्तकरांनी त्यांची निघृर्णपणे हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगवार गाडी घालून अपघात दाखविण्याचा प्रकार केला. त्यामुळे या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी. तसेच धुळे शहरातही अनेक ठिकाणी उघड्यावर गोमांस विक्री होत आहे.
मच्छीबाजारसमोर एका पटांगणाच्या बाजूला, शंभर फुटी रस्त्यालगत अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्या होत आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर विहिंपचे मनोज जैन, नीलेश रुणवाल, गुलाब माळी, योगेश गुरव, जयेश चौधरी, हरी मुंदडा, ईश्वर पवार, प्रितेश अग्रवाल, नितीन गुरव, रोहित विभांडीक, सुनील गोयर आदींची नावे आहेत.
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – चंद्रपूरमधील खंबाडा चेकपोस्टवर कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांची काही गोस्तकरांनी निघृर्णपणे
हत्या केली व त्यांच्या अंगावर वाहन घालून अपघात दाखविण्याचा प्रकार केला. तरी या घटनेतील आरोपींनी फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २० रोजी पोलिस कर्मचारी प्रकाश मेश्राम हे खंबाडा चेकपोस्ट येथे पहाटेच्यावेळी नाकाबंदीवर कर्तव्य बजावत होते. यावेळी काही गोस्तकरांनी त्यांची निघृर्णपणे हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगवार गाडी घालून अपघात दाखविण्याचा प्रकार केला. त्यामुळे या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी. तसेच धुळे शहरातही अनेक ठिकाणी उघड्यावर गोमांस विक्री होत आहे.
मच्छीबाजारसमोर एका पटांगणाच्या बाजूला, शंभर फुटी रस्त्यालगत अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्या होत आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर विहिंपचे मनोज जैन, नीलेश रुणवाल, गुलाब माळी, योगेश गुरव, जयेश चौधरी, हरी मुंदडा, ईश्वर पवार, प्रितेश अग्रवाल, नितीन गुरव, रोहित विभांडीक, सुनील गोयर आदींची नावे आहेत.