नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराचा तिसरा रुग्ण आढळल्यानंतर या आजाराला केरळ सरकारने राज्यावरील आपत्ती असे जाहीर केले आहे. केरळ सरकारच्या आरोग्यमंत्री के.के.शैलजा यांनी याबाबत बोलताना सांगितले, या संसर्गाला प्रभावी पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी हा आजार म्हणजे राज्यावरील आपत्ती असे जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव टॉम जोस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरण समितीने हा निर्णय घेतला.
Kerala: #CoronaVirus has been declared as a state disaster, on directions of Chief Minister Pinarayi Vijayan. pic.twitter.com/04rOXTsAzd
— ANI (@ANI) February 3, 2020
केरळ सरकारच्या आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘कोरोना’चा संसर्ग झालेला तिसरा रुग्ण चीन मधील ‘वुहान’ शहरातूनच आलेला होता. रुग्णाची परिस्थिती स्थिर असून त्याला स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. संसर्ग झालेले तीनही रुग्ण राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. सध्या केरळमध्ये दोनशेजण वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहेत.
केरळमधील अनेक विद्यार्थी चीनमधील वुहान विश्वविद्यालयात शिक्षणासाठी गेलेले आहेत. ते आता परतू लागले आहेत त्यामुळे केरळ सरकारने अतिदक्षता घेतलेली आहे. चीनमधील वुहानसह अन्य भागातून सहाशे भारतीयांना तातडीने परत आणण्यात आले त्यामुळे या कामगिरीबद्दल मोदी सरकारची प्रशंसा जगातील अन्य भागातून होत आहे.