बहुजननामा ऑनलाईन- काश्मीर खोऱ्यातील वाहतुकीस अडथळा आणण्यासाठी बंदुकधारी तरुण स्थानिक नागरिकांना धमकावत आहेत. त्याच्या दुकांनांवर गाड्यांवर फटाके फेकून बंद पाळण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या घटना गेले काही दिवस घडत आहेत. जम्मू कश्मीर राज्याचाा विशेष दर्जा रद्द केल्यामुळे तेथे दैंनदिन जीवन विस्कळीत झाले होते. ते पुर्वपदावर येत असतानाच काही तरुणांनी धुडगुस घालून स्थानिक नागरिकांना दहशतवाद्याचे निर्णय मान्य करण्यास सांगत आहेत.
तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.१) आणि सोमवारी (ता.२) चेहरा झाकलेले दोन बंदुकधारी तरुणांनी करण नगर परिसरातील खासगी वाहनांवर फटाके फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथील दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. अन्यथा त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील अशा धमक्याही दिल्या. तसेच त्यांना संप करण्यासही भाग पाडले. गेल्या आठवड्यात परमपोरा भागात एका दुकानदाराने दुकान बंद ठेवण्याचा हुकूम फेटाळून लावला म्हणून दहशतवाद्यांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली.
तथापि, जम्मू-काश्मीर पोलिस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि अशा देशविरोधी कारवाया कऱणाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांमध्ये भीती पसरविण्याऱ्या दोषींना लवकरच पकडले जाईल. असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान शहरातील भिंती आणि विजेच्या खांबावर हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तैयबासारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे धमक्यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. ज्यात त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन केले नाही तर त्याचे भयानक परिणाम भोगावे लागण्याचा मजकूर दिला आहे.