बहुजननामा ऑनलाइन : जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत मांडण्यात आला. या निर्णयाचे स्वागत देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून होत आहे. ठिकठिकाणी जल्लोष साजरा करत या निर्णयाला पाठिंबा दिला जात आहे. परंतु पाकिस्तानला हा जल्लोष पचेल तरी कसा ? याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी याने आपत्तीजनक ट्विट करत या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. यावर आपल्या भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर ने देखील मागे न राहता त्याची विकेट घेतली आहे.
भारत सरकारने ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. शाहिद आफ्रिदी याने ट्विट करत संयुक्त राष्ट्र्र संघाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्याने आपल्या ट्विट मध्ये संयुक्त राष्ट्र संघाला यावर कारवाई करण्यास सांगितले आहे. यूएनए च्या संकल्पानुसार काश्मीरमधील जनतेला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे , आमच्याप्रमाणे त्यांनाही स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे. शेवटी यूएनएची स्थापना करण्यामागे कोणता उद्देश होता आणि ते काय करत आहेत ? असा प्रश्न त्याने विचारला आहे. तसेच काश्मीरमध्ये मानवतेच्या विरुद्ध हिंसा पसरवली जात आहे. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी या मुद्द्यावर मध्यस्ती घेतली पाहिजे. असेही त्याने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे.
आफ्रिदीच्या या ट्विट वर गौतम गंभीर ने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. गंभीर ने आपल्या ट्विटमध्ये आफ्रिदीचा ‘बेटा ‘ म्हणून उद्देश करून लिहिले कि, काश्मीरमध्ये घडत असलेल्या घटनांची आफ्रिदीने दखल घेतली, याचे कौतुक आहे. पण ते एक गोष्ट विसरले आहेत कि, हे सगळं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घडत आहे. आफ्रिदीचा बेटा म्हणून उल्लेख करत तू चिंता करू नको, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. असा टोला देखील त्याने लगावला आहे.
शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटवर अनेक भारतीयांनी देखील कंमेंट्स पास केल्या आहेत. काहींनी त्याला यूएनएच्या जम्मू-काश्मीर प्रस्ताव वाचण्याचा सल्ला दिला. त्यात एक युजर्स ने हेदेखील म्हंटले आहे कि , या प्रस्तावानुसार पाकिस्तानला पाक व्याप्त कश्मीर सोडावं लागेल, तुम्ही यासाठी तयार आहात का ? याचसोबत गौतम गंभीर ने ३७० कलम हटविण्याच्या प्रस्तावासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ” जे कोणी नाही केले , ते आम्ही करून दाखवले , भारताचे अभिनंदन , काश्मीर मुबारक !” असे देखील त्यानी म्हंटले आहे.