बहुजननामा ऑनलाईन – कर्नाटकमध्ये २०१५ मध्ये तात्कालीन कॉंग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने भाजपाचा विरोध असताना टीपू सुलतान जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कॉंग्रेस-जेडीएस सरकारच्या काळात टीपू सुलतान जयंती धुमधडाक्यात साजर करण्यात येत होती. मात्र, आता कॉंग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेले बी.एस. येडियुरप्पा यांनी टिपू सुलतान जयंती साजरी न करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावरुन कर्नाटकातील राजकारणातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Chief Minister BS Yediyurappa led Karnataka Government orders Kannada & Culture Department, to not celebrate Tipu Jayanti. The decision was taken during yesterday's cabinet meeting. (file pic) pic.twitter.com/6slPyDaq8w
— ANI (@ANI) July 30, 2019
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीपू सुलतान यांची जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून कन्नड संस्कृती विभागाला यासंबधीचे आदेश देण्यात आले होते. भाजपाचे आमदार के. जी. बोपय्या यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांना पत्र लिहून टीपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शविला आहे. या पत्रामध्ये के. जी बोपय्या यांनी म्हटले की, ‘कडगु लोकांच्याविरोधात टीपू सूलतान यांनी कोणत्याही कारणाशिवाय युद्ध केले होते. या युद्धात कडगु लोक मोठ्या प्रमाणात शहीद झाले होते.’
कोण होता टीपू सुलतान ?
टीपू सुलतान हा १८ व्या शतकातील म्हैसुरचा शासक होता. दरवर्षी १० नोहेंबर दिवशी यांची जयंती साजरी केली जाते. मात्र, टीपू सुलतान हा मुस्लिम शासक होता. त्याने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले, मंदिरे तोडली असा इतिहास असल्याचे काही जणांचे मत आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच टीपू सुलतानच्या जयंतीला भाजपाचा तीव्र विरोध होता.