बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबई पोलिसांविषयी गंभीर विधान केलं होतं. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असे म्हणत कंगणाने मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. तिने भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर ही भूमिका घेतली होती. या भूमिकेवरून काँग्रेसने कंगनाला सल्ला देताना राम कदमांच्या वर्मावर बोट ठेवले.
आ. राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा देण्यात यावी, द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विटवर बोलताना “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, असं उत्तर अभिनेत्री कंगनाने दिलेले होते. इतकेच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको.,” असंही कंगना म्हणाली होती.
Well @KanganaTeam , actually you should be scared of the person whom you are thanking. Very dangerous for girls! https://t.co/EOkhMRlGDG
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2020
कंगनाच्या या भूमिकेने काँग्रेसने तिला सल्ला दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून तुम्ही राम कदम यांच्यापासून घाबरून राहायला हवं, असे म्हटले आहे. “कंगनाजी खरंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे आभार मानले आहेत, त्याच्यापासूनच घाबरून राहायला हवं. मुलींसाठी ती व्यक्ती फार धोकादायक आहे,” असं म्हणत सावंत यांनी कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे.
राम कदम यांच्या ट्विटवर बोलताना कंगनाने हे ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी, पण मुंबई पोलीस नको प्लिज”, अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं.