बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची ’क्वीन’ कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या नेपोटिझमच्या वादामध्ये कंगनाने उडी घेतली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांवर टीका केली होती. दरम्यान कंगना आणि करण जोहर यांच्यामध्ये वाद असून दोघांनीही बर्याचदा एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावेळी कंगनाने करण जोहरवर टीका करताना तिने सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग करीत योग्य कारवाईची मागणी केली आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1300778227594670081
कंगनाने करण जोहरला मूव्ही माफियांचा मुख्य गुन्हेगार म्हटले आहे. इतक्या सर्व जणांचे करिअर आणि आयुष्य संपवल्यानंतरही तो मुक्त आहे, आतापर्यंत त्याच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आहे. आमच्यासाठी काही आशा आहे का?’ असा सवाल तिने पंतप्रधानांना विचारला आहे. ’सर्व काही शांत झाल्यावर ही तरसांची टोळी माझ्या मागे येईल.
असेही ती पुढे म्हणाली. कंगनाने करणच्या नव्या पुस्तकाची घोषणा करणारे ट्वीट रीट्वीट करत देखील त्याचा समाचार घेतला आहे. स्वत:च्या मुलांना प्रमोट करत असल्याचा आरोप कंगनाने करणवर केला आहे. याप्रकरणी ड्रग अँगल समोर आल्यानंतर कंगना रणौतने मदत करू इच्छित असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सांगितले होते. इंडस्ट्रमध्ये येणारे ड्रग आणि त्यासंबंधी अनेक गोष्टी माहिती असल्याचा दावा तिने केला होता. त्यामुळे ती मदत करू इच्छित असल्याचे कंगनाने म्हटले होते.