बहुजननामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना राणावतने पालिकेकडे नुकसानभरपाई म्हणून 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मागणीसाठी कंगनाने काल उच्च न्यायालयात सुधारित याचिका केली. मुंबई महापालिकेने बंगल्यातील बांधकाम बेकायदेशीररीत्या तोडल्याचा आरोप तिने केला आहे.
राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा सूड म्हणून पालिकेने बंगल्यातील बांधकामावर कारवाई केल्याचा आरोप कंगनानेा सुधारित याचिकेत केला आहे. मी एक सार्वजनिक वलय असलेली व्यक्ती आहोत. महत्त्वाच्या मुद्दयांवर मते मांडत असते. काही जनहितार्थ मुद्दे राज्य सरकारकडून योग्य प्रकारे हाताळले जात नसल्याबाबत मते व्यक्त केली होती.
त्यावरून सरकारचा भाग असलेल्या एका राजकीय पक्षाकडून मला लक्ष्य केले जात आहे. मुंबईत येण्यावरूनही आपल्याला धमकावण्यात आले. याच राजकीय पक्षाची पालिकेत सत्ता आहे. पालिकेने केलेली कारवाई बेकायदा ठरवावी आणि नुकसानभरपाई म्हणून दोन कोटी रुपये देण्याचे आदेश पालिकेला द्यावेत, अशी मागणी कंगनाने केली आहे.