मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मागील काही दिवसापासून राजकारणात आरोप-प्रत्यारोप दिसून येत आहे. तसेच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडी सरकारवर वारंवार आक्रमक होताना पाहायला मिळाले आहेत. परंतु आता एका जेष्ठ माजी IPS अधिकाऱ्याने फडणवीस यांची चांगलीच कानउघडणी केलीय. तर फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ अर्थात घाईत असल्याने ते चुकीची पावले टाकत असल्याचा दावा माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेलो यांनी केलाय.
माजी आयपीएस रिबेलो म्हणाले, भाजप महाविकासआघाडी सरकारवर कुरघोडी करण्यासाठी टोकाला जाताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात भाजपचा हा प्रयत्न फसला. वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आताही भाजपने तेच करण्याचा प्रयत्न केला. आता लोकांच्या डोक्यात कोरोनाचा विषय आहे. रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादेपलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे. लोकांना हा प्रकार फारसा रुचणारही नाही, असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, अशी टीका माजी IPS रिबेलो यांनी केली आहे.
यावरून IPS रिबेलो यांनी एका वृत्तपत्रात याबाबत लेख लिहिला आहे. तसेच ते पुढे म्हणतात, रेमडेसिव्हीर तुटवड्या ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस ठाण्यात गेले. राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सर्व गोष्टी फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला, तसेच, ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला. खरंतर रेमडेसिवीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. कोरोना संकटात फक्त राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या ५ वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे, असा संशय माजी IPS अधिकारी ज्युलिओ रिबेलो यांनी व्यक्त केलाय.