बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मागील नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून टीका होत आहे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सरकार स्थापन केल्यापासून विरोधी पक्ष भाजप टीका करत आहे. त्याचबरोबर भाजपकडून अनेकदा सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं देखील समोर आलं होते. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नवीन भाकीत केले आहे.महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी हे भाकीत मांडले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि,महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवतेय, कुठून चालतंय हे काहीही कळत नाही. हे सरकार घरी पाठविण्यासाठी निशाणा साधण्याची वेळ आली आहे. त्यामुळं लवकरच भाजप सत्तेत दिसेल असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. त्यामुळं आता पुढील काही महिन्यात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण काय रंग घेते याकडं सर्वांचं लक्ष लागणार आहे. याविषयी अधिक बोलताना नड्डा ,म्हणाले कि, जनतेने फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कौल दिला होता. मात्र मित्रपक्षाने धोका दिल्यानं महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन झालं नाही. पण लवकरच राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.त्याचबरोबर कार्यकारिणीतील इतर सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी नड्डा यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शेतकरी कायद्यावरून नड्डा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना नड्डा म्हणाले कि,शरद पवार यांनी शेतकरी कायद्याचं समर्थन केलं तर ते चांगले आणि मोदींनी ते पास केले तर ते वाईट कसे ? दरम्यान, यावेळी अधिवेशनात केंद्राच्या शेतकरी कायद्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटतील. असे ठराव देखील मंजूर करण्यात आले