जयपूर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे काँग्रेसचे पानिपत झाले त्याप्रमाणे बहुजन समाज पक्षालाही अपेक्षेप्रने जागा जिंकता नाही आल्या नाही. त्यातच आता राजस्थानातील बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांची राज्यपाल कल्याण सिंग यांच्यासोबतची बैठक सोमवारी रद्द करण्यात आली, मात्र राज्यात सत्तेत असणाऱ्या गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा कायम राहील, असे स्पष्ट केले.
राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा असून यापुढेही तो कायम राहील असे बसपाचे आमदार वाजीब अली यांनी येथे सांगितले. राज्यपाल कल्याण सिंग यांच्यासोबत आमची सदिच्छा बैठक होणार होती. त्यात काही सर्वसाधारण मुद्दय़ांवर चर्चा होणार होती, मात्र बसपाचा एक आमदार येथे पोहोचू न शकल्याने बैठक रद्द झाली असे अली यांनी सांगितले.
या राज्यपालांसोबत होणाऱ्या भेटीत अशोक गेहलोत सरकारच्या पाठिंब्याचा मुद्दा नव्हता असे अली यांनी स्पष्ट केले. बसपाचे राजस्थान अध्यक्ष सीताराम मेघवाल यांनीही राज्यपालांसोबत बैठक ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.