पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. मात्र आता अखेर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी याविषयी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही. अमिताभ बच्चन यांचेही सिनेमे फ्लॉप होतात त्यामुळे खचून जावू नका असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी पराभूत उमेदवारांना सल्ला देताना त्यांनी म्हटले कि, सर्वच उमेदवारांनी एका पराभवाने खचून न जाता काम करत राहावे. पुढे आपल्याला अजून काम करायचे आहे. बारामतीच्या विजयावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, बारामतीचा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. मला खडकवासल्यातून इतकं विरोधी मतदान का झालं याचा आढावा त्यानी आजच्या बैठकीत घेतला. आम्ही पुन्हा लोकांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास संपादन करू असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.