पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मिलिंद तेलतुंबडे हा माझा लहान भाऊ आहे, मात्र गेल्या ३८ वर्षांपासून त्याच्याशी माझा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. मिलिंद माझ्या कुटुंबाचा एक सदस्य आहे, म्हणून जर त्याच्या चळवळीशी संबंध जोडत असाल तर हे खेदजनक आहे. अश्या शब्दात डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी संताप व्यक्त केला.
भीमा कोरेगाव प्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे याना अटक करण्यात आले होते, मात्र विशेष न्यायालयाने त्यांची अटक बेकायदा ठरवली दरम्यान, त्यांची सुटका झाल्या नंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी, पोलिसांनी हा सर्व बनाव रचला आहे. मी १९८१-८२ मध्ये गुजरातमध्ये आयआयएममध्ये असताना मिलिंदचा नक्षली चळवळीशी संबंध आला. याला ३८ वर्षे झाली. त्यानंतर आमचा कधीही संपर्क आला नाही. त्याच्या चळवळीशी आमचा संबंध जोडणे चुकीचे आहे. एल्गार परिषदेसाठी आलेले माझे मित्र व नातेवाइकांना परिषदेआधी भेटलो. पण त्यानंतर गोव्याला गेलो. परिषदेत काय झाले, याची माहिती नव्हती. भीमा कोरेगावला घडलेला प्रकारही नंतर कळाला. अशा परिषदा घातक ठरू शकतात, यावर लेख लिहिला. त्यावर देशभरातून अनेक विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. देशात सध्या कायद्याचे राज्य नाही. कायद्याचे राज्य असते तर या घटनांची भीती वाटली नसती. पण राज्यकर्ते जे करायचे ते करत आहेत. संपूर्ण यंत्रणा आपल्याविरोधात कारस्थान करत असल्याने भीती वाटत आहे. माझ्या विरोधात पोलीसांनी ईमेलचे पुरावे दिले असले तरी, ईमेल खोटे तयार केले जाऊ शकतात. पुरावेही बनावट तयार करून मला अडकविले जात आहे. त्यामुळे न्यायालयात त्याची प्रामाणिकता सिध्द होईल. असे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, मिलिंद तेलतुंबडे हा माझा लहान भाऊ असला तरी मागील ३८ वर्षे त्याच्याशी कसलाही संपर्क नाही. तो कुटुंबाचा एक सदस्य असला म्हणून थेट त्याच्या चळवळीशी संबंध जोडणे खेदजनक आहे. एल्गार परिषदेशीही काही संबंध नाही. देशात सध्या कायद्याचे राज्य नसून राज्यकर्त्यांना जे काम करायचे ते करत आहेत. बनावट पुरावे तयार करून मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फॅसिझम आहे. यामागे नेमका सूत्रधार कोण आहे, हे त्यानांच माहित असेल, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.