नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकेत उघडलेले खातेच आता तुमची आणि तुमच्या कुटुंबाची देखभाल करू शकते. विशेषकरून कोरोना महामारीच्या या काळात तुमच्या अडचणी दूर करेल. परंतु यासाठी आवश्यक आहे की, तुमच्या बँक खातयात 442 रुपये असावेत. 31 मेपर्यंत इतकी रक्कम असणे आवश्यक आहे. याच रक्कमेतून प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाय) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेचे (पीएमजेजेबीवाय) नूतनीकरण होईल. यासाठी बँक खातेधारकांना आवाहन केले जात आहे की, त्यांनी आपल्या बँक खात्यांमध्ये 442 रुपये आवश्यक ठेवावे.
नूतनीकरणासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी 330 रुपये आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेंतर्गत खात्यातून 12 रुपये वार्षिक हप्ता घेतला जाईल. कोरोनाच्या संकट काळात योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांनी आपल्या खात्यात 442 रुपये आवश्य ठेवावे.
यांना मिळणार योजनेचा फायदा
पंजाब नॅशनल बँकेशी संबंधीत अधिकारी एम. एल. गिडवाणी यांनी सांगितले की, सर्व राज्य सरकारकडून बीपीएल कुटुंब किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, आणि 18-50 वर्षाच्या वयाच्या दरम्यान कोरोनाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर केंद्र सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत 31 मे 2021 च्यानंतर नॅचरल डेथ आणि कोविडसह सर्व प्रकारच्या मृत्यूच्या प्रकरणात एमएमपीएसवाय (मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना) आणि पीएमजेजेबीवाय (प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना) च्या अंतर्गत दोन-दोन लाख रुपयांची भरपाई मिळेल.
लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाइी कॉमन सर्व्हिस सेंटरवर अर्ज करावा. सर्व्हिस सेंटरमधून फॉर्म भरल्यानंतर एक कागदपत्र मिळेल, तो बँकेत घेऊन जाऊन खात्यासोबत अपडेट करावा लागेल. मात्र, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही केवळ अपघात योजना आहे.