नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल आणि तुम्ही तुमच्या सहप्रवाशाला धमकावण्याचा प्रयत्न केला तर सावध व्हा, कारण भारतीय रेल्वे अशा प्रवाशांवर बंदी आणण्याचा विचार करत आहे. मंगळवारी रेल्वेच्या अधिकार्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे ज्या प्रवाशावर विमान प्रवासाची बंदी असेल त्याच्यावर रेल्वेतही प्रवास करण्यावर बंदी घातली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्याने सांगितले की, विमानात नेहमी काही प्रवाशी, सहप्रवाशासोबत वाईट वर्तन करतात आणि इतर प्रवाशांचा जीव सुद्धा धोक्यात घालतात.
जे विमान प्रवासात असे करतात त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली जाते. भारतीय रेल्वेसुद्धा अशा प्रवाशांवर येत्या काही महिन्यात बंदी आणण्याचा विचार करत आहे. जर अशा प्रवाशावर एयरलाईनमध्ये बंदी घातली गेली तर त्या प्रवाशांवर भारतीय रेल्वेसुद्धा बंदी घालणार आहे.अधिकार्याने म्हटले, रेल्वे एयरलाईन्सकडून अशा प्रवाशांची यादी घेईल आणि त्यानंतर अशा प्रवाशांना आपल्या सिस्टममध्ये सुद्धा रजिस्टर करेल. यानंतर असे प्रवासी काही महिन्यांसाठी तिकिट बुक करू शकणार नाहीत. अधिकार्याने सांगितले की, भारतीय रेल्वे अशा प्रवाशांवर 6 महिन्यांसाठी बंदी घालण्याची योजना करत आहे.
अधिकार्याने सांगितले की, नॅशनल ट्रान्सपोर्टरला हा विचार तेव्हा आला जेव्हा मंगळवारी इंडिगोच्या विमानात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने एका पत्रकाराला प्रश्न विचारून त्रास दिला आणि त्यास भेकड म्हटले. कामराने या प्रसंगाचा व्हिडिओसुद्धा तयार केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या दरम्यान, अन्य प्रवाशी सुद्धा त्रस्त झाले होते. ज्यानंतर इंडिगोने कुणाल कामरावर 6 महिन्यांसाठी बंदी घातली. हे फ्लाइट मुंबईहून लखनऊला जात होते.
Visit : bahujannama.com