नागठाणे : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएसएआय) ला प्लास्टिक कचर्यापासून रस्ता तयार करण्याचे तंत्रज्ञान देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या तंत्रज्ञानाने रस्ते बांधणीत प्लास्टिकचा वापर केला जाईल. कंपनीने रायगड जिल्ह्यातील आपल्या प्रकल्पात या तंत्रज्ञानाचे परीक्षण केले आहे. याशिवाय कंपनी अन्य अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. कंपनीने आपल्या प्रकल्पात 50 टन प्लास्टिक कचरा कोलटारसोबत मिसळून सुमारे 40 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला आहे.
18 महीन्यात विकसित झाली प्रणाली
कंपनीचे पेट्रोकेमिकल व्यवसायाचे मुख्य संचालन अधिकारी विपुल शाह यांनी पत्रकारांना सांगितले की, पॅकेटबंद सामानाचे रिकामे पॅकेट, पॉलीथीन बॅगसारख्या प्लास्टिक कचर्याचा वापर रस्ता बांधणीसाठी करणारी ही प्रणाली विकसित करण्यासाठी आम्हाला सुमारे 14 ते 18 महीन्यांचा कालावधी लागला. आम्ही अशा प्रकारच्या रस्ताबांधणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारशी चर्चा करत आहोत. या रस्ते बांधणीत प्लास्टिक कचर्याचा वापर केला जाऊ शकतो. एनएचएआयशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील अन्य राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांना सुद्धा हे तंत्रज्ञान देण्यासाठी चर्चा करत आहे. कंपनीचे तंत्रज्ञान अशा प्लास्टिक कचर्यासाठी विकसित करण्यात आले आहे ज्याचे विघटन अशक्य आहे. या कचर्याचा उपयोग रस्ते बांधणीसाठी करण्याबाबत शाह म्हणाले, यामुळे प्लास्टिक कचरा वापरला जाईल शिवाय रस्ते बांधणीचा खर्चही कमी होईल.
एक किलोमीटर रस्ता तयार केल्यास 1 लाख रूपयांची बचत
त्यांनी सांगितले की, आमचा अनुभव सांगतो की, या तंत्रज्ञानाने एक किलोमीटर रस्ता तयार करण्यासाठी एक टन प्लास्टिक कचर्याचा वापर होतो. यातून एक लाख रूपये वाचतील. अशा पद्धतीने आम्ही 40 लाख रुपये वाचवले आहेत. या रस्ते बांधणीत कोलटारच्या आठ ते दहा टक्के वापराच्या पयार्याने आम्ही या प्लास्टिक कचर्याचा वापर करू शकतो. एवढेच नव्हे तर रस्त्याचा दर्जाही वाढवू शकतो. या तंत्रज्ञानाने रस्ते तयार करण्यास दोन महिन्याचा कालावधी लागला. या पद्धतीने बांधलेला रस्ता मागच्या पावसाळ्यातही खराब झाला नाही. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नागठाणे येथे रिलायन्सचा मोठा पेट्रोकेमिल प्रकल्प आहे. भारत सरकारकडून हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी रिलायन्सने विकत घेतला होता. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक दाण्याची निर्मिती केली जाते. यातील टाकावू आणि पक्का माल या नव्या तंत्रज्ञानासाठी वापरून कंपनीला मोठी फायदा होऊ शकतो, असे याबाबत सूत्रांनी सांगितले.
Visit : bahujannama.com