नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाचा कहर दररोज नवीन विक्रम करत आहे. वर्ल्डोमीटरनुसार, रविवारी एका दिवसात कोरोनाची विक्रमी 3,54,531 नवीन प्रकरणे आढळली. ही एखाद्या देशात एका दिवसात आढळलेल्या कोरानाच्या नवीन प्रकरणांची जगभरातील सर्वाधिक संख्या आहे. या दरम्यान संसर्गाने विक्रमी 2,806 लोकांचा मृत्यू झाला. देशात एका दिवसात महामारीने जीव गमावणार्यांची ही सर्वाधिक संख्या आहे.
देशात अनेक दिवसांपासून रूग्ण आणि मृत्यूंची संख्या सर्वाधिक नोंदली जात आहे. हा लागोपाठ सहावा दिवस आहे ज्यात नव्या संक्रमितांची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त होती. यामुळे संसर्गाची एकुण प्रकरणे वाढून 1 कोटी 73 लाख 4 हजार 308 वर पोहचली आहेत, तर एकुण मृतांची संख्या 1 लाख 95 हजार 116 वर पोहचली आहे.
उपचाराधीन रूग्ण वाढून 16.2 टक्के झाले
उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात एकुण उपचाराधीन रूग्ण 28 लाख 7 हजार 333 आहेत, जी संसर्गाच्या एकुण प्रकरणांच्या 16.2 टक्के आहेत.
बरे होण्याचा दर कमी होऊन 82.6 टक्के झाला
कोरोनाने बरे होणार्या लोकांचा दर घसरून 82.6 टक्के राहिला आहे. आकड्यांनुसार, या आजारातून बरे होणार्या लोकांची संख्या वाढून 1,42,96,640 झाली आहे तर मृत्यूदर घसररून 1.13 टक्के राहिला आहे.
सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात
देशात एका दिवसा ज्या 2,806 रूग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यापैकी 832 जणांचा महाराष्ट्रात मृत्यू झाला. दिल्लीत 350, युपी 206, छत्तीसगढ 199, कर्नाटक 143, गुजरात 157, झारखंड 103 आणि बिहारमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला.
27.7 कोटीपेक्षा जास्त चाचण्या
भारतीय वैद्यकीय शास्त्र संशोधन परिषदेनुसार, 25 एप्रिलपर्यंत 27,79,18,810 नमून्यांची तपाणी करण्यात आली ज्यापैकी 17,19,588 नमून्यांची चाचणी शनिवारी करण्यात आली.