बहुजननामा ऑनलाइन : कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध मुस्लिम धर्मगुरू इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी देखील भारताच्या बाजूने आपले मत मांडल्याचे दिसून आले . ” जम्मू – काश्मीरच काय तर पाकिस्तान देखील भारतातच एक भाग आहे आणि भारत हा इस्लाम पेक्षा जुना आहे. हे आपण सर्वानी मान्य करायला हवे, ” असे मत त्यांनी मांडले. एवढेच काय तर काश्मीर हा कधीच पाकिस्तान चा होऊ शकत नाही. असे सांगून त्यांनी पाकिस्तान ला चांगलेच सुनावले आहे.
इमाम मोहम्मद तौवहिदी आपल्या ट्विट मध्ये लिहितात कि, “काश्मीर हा कधीच पाकिस्तान चा भाग नव्हता आणि या पुढेही तो कधी नसणार. एवढेच काय पाकिस्तान आणि भारत दोन्ही भारताचेच भाग आहेत. मुस्लिम हिंदू धर्म सोडून इस्लाम मध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचाच आहे. भारत हा इस्लाम पेक्षादेखील जुना आहे.”
इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी पाकिस्तान ला चांगलीच लगावली आहे . यांनी याआधीही पाकिस्तानला झापले होते. ” पाकिस्तान ने आपल्या संविधानात सर्व नागरिकांना समान हक्क देण्याबद्दल नमूद केले आहे. तरी पाकिस्तान अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष करत आहे. पाकिस्तान हा नेहमी दहशतवाद्यांना समर्थन करत असतो. त्यामुळे दहशतवाद्यांना पाकिस्तान म्हणजे स्वर्ग झाला आहे. पाकिस्तान नेहमी दहशवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अन्य राष्ट्रांकडून लाखो डॉलर घेत असते, परंतु करत काहीच नाही.” असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी वारंवार काश्मीर हि हिंदूंचीच भूमी सांगितले आहे,” माझे अजूनही मत हेच आहे , काश्मीर पाकिस्तान चा भाग कधीच होऊ शकत नाही. ”
https://twitter.com/Imamofpeace/status/1160568511397109760